Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ मार्च, २०२५

शिरपूर तालुक्यातील अन्नपूर्णा फायनान्स प्रा.लि.च्या नावाखाली फसवणूक फसवणुकीचा बळी ठरलेल्या १९ जणांनी पोलिसांकडे केली तक्रार



• अन्नपूर्णा फायनान्स प्रा. लि. च्या नावाखाली फसवणूक.

प्रत्येकी ७५ हजार व ४० हजार रुपये काढले.

• पोलिसांकडे कायदेशीर कारवाईची मागणी.

शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील तांडे व परिसरातील इतर गावात १९ पेक्षा जास्त नागरीकांची अन्नपूर्णा फायनान्स प्रा.लि.च्या नावाखाली फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारदारांनी शिरपूर शहर व थाळनेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाम नंदू बोरसे व आकाश नंदू बोरसे (रा.दहिवद ता.शिरपूर) यांनी त्यांना अन्नपूर्णा फायनान्स प्रा.लि.च्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडून कागदपत्रे घेतली असून शाम नंदू बोरसे व आकाश नंदू बोरसे यांनीतक्रारदारांना प्रत्येकी ७५ हजार आणि ४० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. व तक्रारदार यांना विश्वासात घेऊन शाम नंदू बोरसे व आकाश नंदू बोरसे यांनी अॅक्सिस बँकेत त्यांची खाती उघडली आणि त्यांना

एटीएम कार्ड दिले. मात्र एटीएम कार्ड द्वारे संबंधीतांनी तक्रारदारांच्या खात्यातून प्रत्येकी ७५ हजार आणि ४० हजार रुपये काढून घेतले. जेव्हा पीडितांना खात्यातून पैसे काढल्याचे समजले, तेव्हा त्यांनी शाम नंदू बोरसे व

आकाश नंदू बोरसे यांच्याकडे विचारणा केली. मात्र संबंधीतांनी त्यांना समाधानकारक उत्तर दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी परिसरातून व तक्रारदारांकडून होत आहे.

(सविस्तर वाचा पुढील अंकात)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध