Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील गाळ ठरतोय डोकेदुखी ; साक्रीतील सर्वच धरणांत सुमारे ५० टक्के गाळ
धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील गाळ ठरतोय डोकेदुखी ; साक्रीतील सर्वच धरणांत सुमारे ५० टक्के गाळ
धुळे प्रतिनिधी : जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांत गाळ साचला आहे. यामुळे सिंचन प्रकल्प उन्हाळ्याच्या मध्यात किंवा एप्रिलमध्येच कोरडे होतात किंवा त्यातील जलसाठा कमी होतो. हा गाळ काढून प्रकल्प कसे १०० टक्के पाण्याच्या क्षमतेने भरतील, असाही मुद्दा आहे.
शिरपुरातील अनेर, धुळे तालुक्यातील सोनवद, शिंदखेड्यातील अमरावती आदी प्रकल्पांतही गाळ आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे अनेकदा दुष्काळाचे सावट असते.
यंदा पाऊस झाला. पण सिंचन प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे, अशी स्थिती नाही. कारण प्रकल्पांत गाळ आहे. आपत्तीमुळेच नव्हे तर शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जलसंकट तयार होते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण दर वर्षी सिंचन प्रकल्पांतील गाळ वाढत आहे. मध्यम, लहान-मोठ्या प्रकल्पांतील गाळ काढणे आवश्यक आहे. साक्री तालुक्यातील सर्वच लहान-मोठ्या धरणांत सुमारे ५० टक्के गाळ साचल्याची स्थिती आहे.गेल्या वर्षी गाळामुळे जलसाठा संपुष्टात आला. दुष्काळाचे चटके अधिकच सहन करण्याची वेळ आली. हे. गाळ अधिक साचल्यामुळे पाणीसाठा कमी असतो. दरवर्षी पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली असल्याची स्थिती अनेक भागात आहे. गाळ काढण्यासाठी शासनाची उदासीनता दिसून येते. शासनाने 'गाळमुक्त धरण' अशी अभिनव योजना आणली होती. शासनाच्या अनेक योजना कल्याणकारी असतात यात शंकाच नाही.
पण राबविणारी यंत्रणा, अधिकारी यांनी पोटतिडकीने काम करणे आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. गाळमुक्त धरण योजनेत शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चात गाळ काढून न्यावा अशी तरतूद होती. पण त्याबाबत सध्या कुठेही सकारात्मक चित्र शासनस्तरावर दिसत नाही.
गाळाचा खर्च न परवडणारा
गेल्या वेळेस फेब्रुवारी महिन्यात साक्री तालुक्यातील तीन मध्यम व आठ लघु प्रकल्प मिळून एकत्रित सरासरी केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. आहे. साक्री तालुक्यात आदिवासी भागातील काबऱ्याखडक, लाटीपाडा, मालनगाव, जामखेली यांसारखे प्रकल्प आहेत. धरण क्षेत्राजवळ असलेल्या आदिवासी बांधवांना गाळ काढून नेण्यासाठीचा खर्च न परवडणारा आहे. शासकीय मदत मिळाल्यास गाळमुक्त धरण योजनेस बळ मिळणार आहे. तालुक्यात प्रमुख तीन मध्यम, तर आठ लघु प्रकल्प आहेत. सद्यःस्थितीत पिंपळनेरच्या लाटीपाडा प्रकल्पाची पाणीसाठ्याची क्षमता १,२५८ एमसीएफटी आहे.पण एवढे पाणी त्यात साचत नाही. मालनगाव प्रकल्पाची पाणीसाठ्याची क्षमता ४१० एमसीएफटी असून, प्रत्यक्षात एवढा जलसाठा चांगला पाऊस झाल्यानंतरही नसतो.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा येथे सप्टेबर २०२४ शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन १६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर ३-४ नराधमांनी केलेल...
-
अमळनेर: तालुक्यातील चौबारी येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना १९ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माह...
-
अमळनेर : तालुक्यातील बोहरा रस्त्यावर १६ रोजी महसूल पथकाने अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून मुद्देमालासह तहसील कार्य...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
रस्ता मंजूर नाही;पाटी का लावली? ग्रामस्थांचा सवाल नंदूरबार प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगलापाणी ५ किलोमीट...
-
शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री खंडेराव महाराजांचा यात्रौत्सव उद्या दि.१२ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. महाआरतीच...
-
संपादकीय भारताच्या संविधानाने आम्हाला मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. संविधान कायद्यापुढे समानता ही आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीस भारताच्या...
-
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.28 महाराष्ट्र बोर्डाने मार्च2020 दहावीच्या निकालाची तारीख आता जाहीर केली आहे. उद्या म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा