Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४
मच्छीमार समाज करिता नवीन भूजल महामंडळ लवकरच स्थापन होणार
मुंबई, दिनांक ३० /०९/२०२४ रोजी मुंबई मंत्रालय या ठिकाणी माननीय ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक तथा मस्य व्यवसाय यांच्या अध्यक्ष ते खाली मंत्रालय मुंबई येथे बैठक घेण्यात आली त्या बैठकीत मत्स्य विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, आयुक्त मत्सव्यवसाय डॉ. अतुलजी पाटणे, महाराष्ट्र राज्य, उपसचिव श्री.कि.म.जकाते, अँड. अमोल बावणे महाराष्ट्र राज्य मत्स्यउद्योग विकास धोरण समिती सदस्य, श्री अमितजी चावले प्रतिनिधी, श्री रमेश सोनवणे प्रतिनिधी, श्री, जितू टिंगूसले संस्थेची प्रतिनिधी.व इतर अधिकारी उपस्तिथ होते
माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षते खाली मत्स्य व्यवसाय सोसायटी व मासेमारी समाज यांच्या समस्या बाबत मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडली असून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील भूजल जलाशयातील मासेमारी समाज यांच्या विकासाकरिता नवीन भूजल कल्याणकारी महामंडळ तात्काळ स्थापन करण्यात येणार असून त्या बाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना दिले आहे.
संस्थेला प्रति हेक्टरी १५०० किलो मत्स्य उत्पादन करणे गरजेचे ही अट रद्द करण्यात आली,
बिटूकली चे अनुदान लवकरात लवकर संस्थेच्या खात्यात देण्यात येणार या बाबात जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहे,
नायलॉन सूत जाळे, डोंगे यांचे अनुदान सभासद यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येहील,
मासेमारी संस्थेवर असणारे कर्ज माफी बाबत चा प्रस्थावा तयार करण्याचे सूचना देण्यात आल्या आहे.
जुलै २०२४ मध्ये ऑल दृष्टीमुळे मासेमारी सहकारी संस्थांना झालेल्या नुकसान भरपाई बाबत चर्चा करण्यात आली व तश्या सूचना सबंधित अधिकारी याना देण्यात आल्या .,
मासेमारी संस्था व समाज यांच्या इतर समश्या बाबत चर्चा करण्यात आली त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्रामध्ये सागरी किनाऱ्यावर मासेमारी करणारा समाज असून त्यांच्या करिता स्वतंत्र महामंडळ स्थापन होणार व
महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक मासेमारी करणारा समाज व संस्था हा भुजल जलाशयात मासेमारी करतात त्या करिता त्यांच्या विकासा च्या उद्देश्याने भूजल महामंडळ ची स्थापना करण्यात येणार आहेत. अँड. अमोल बावणे मत्स्य उद्योग विकास धोरण समिती सदस्य. व प्रतिनिधी यांनी बैठकीमध्ये भुजल महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली असून महामंडळ स्थापन झाल्यानंतर त्याचे कार्यालय नागपूर येथे घेण्यात यावे, सर्वाधिक भुजल संस्था ह्या विदर्भात असल्यामुळे भूजल जलाशयातील महामंडळाचे कार्यालय नागपूर या ठिकाणी घेण्यात येणार अशी मागणी मान्य केली आहे,
भूजल महामंडळ स्थापन झाल्यास भूजल जलाशयातील संस्था व मासेमारी करणारा समाज यांचा सर्वांगीण विकास होणार, त्या करिता. माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मासेमारी करणाऱ्या नदी नाल्यातील समाज व मत्स्य सोसायटी यांच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक, व्यवसायिक जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी या महामंडळ स्थापन करण्याचा माननीय मंत्री महोदयाचा उद्देश आहेत, त्याकरिता अँड. अमोल बावणे महामंडळ कार्य प्रणाली साठी वेळो वेळी सूचना व माहिती पुरवावी व अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना वर अंमलबजावणी करावी असा आदेश मत्स्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला.
या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे भूजल जलाशयातील सर्व मासेमारी समाज यांच्यामध्ये आनंदाची वार्ता पसरली असून मासेमारी समाजाकडून माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निर्णयाचे कौतुक व स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे व मासेमारी समाजामध्ये आनंदाची दिवाळी साजरी होत आहे.
भूजल महामंडळाचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी होणार
अँड.अमोल बावणे यांच्या प्रयत्नांना यश
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
राज्यात सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्...
-
1) कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू (महसूल विभाग) 2) ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्स...
-
साक्री तालुक्यातील शेवडीपाडा येथे जल जिवन मिशन योजनेत मौजे शेवडीपाडा येथे नळ पाणी पुरवठा जलजीवन योजनेतील संबंधित यंत्रणेचे अधिकारी संगनमताने...
-
मुंबई, दि. २७: - राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील सदैव...
-
दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी 1972 मध्ये मुकटी धुळे गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.काँग्रेस पक्षात युव...
-
पुणे, दि.२९: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रो टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेच...
-
अमळनेर प्रतिनिधी - अमळनेर येथील शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मंत्री अनिल पाटील यांना झालेल्या बैठकीत पाठींबा जाहीर केला आहे. समस...
-
धुळे (प्रतिनिधी) येथील स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासन विभागाने गोपनिय माहितीच्या आधारे बुधवारी संयुक्तरित्या शहरातील मिरची मसाल्या...
-
नाशिक, दि. २८ : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत.त्यांनी शेतकरी,कामगार,महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्...
-
धुळे प्रतिनिधी :- काल धुळे शहरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ची शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली, यात्रेत जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे आणि ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा