Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

आईने बाजाराला सोबत नेले नाही म्हणून मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या



अमळनेर (प्रतिनिधी) आईने बाजाराला सोबत नेले नाही म्हणून तालुक्यातील पिळोदे येथील १४ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १२ रोजी घडली आहे. पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, पिळोदे येथील मालुबाई सुधाकर कोळी या बाजार करण्यासाठी अमळनेर जाणार होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी माया सुधाकर कोळी (वय १४) ही सोबत येण्यासाठी हट्ट करत होती. मात्र मालुबाई यांनी तिला नकार दिल्याने माया हिने संतापात घराचा दरवाजा आतून लावून घेतला होता. मालूबाई ह्या बाजार करून आल्यानंतर माया हिने साडीच्या सहाय्याने लाकडी सऱ्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने तिला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ गणेश पाटील हे करीत आहेत.

प्रतिनीधी
गणेश चव्हाण
अमळनेर जळगाव


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध