Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४
!! पत्र लेखन !! युगकर्त्यास पत्र. (देवाला पत्र )
विषय :- कलियुगात जनतेस होतं असलेल्या त्रास बद्धल.
श्री. देवाधिदेव राजे युगपुरुष देवा.
स. न. वि. वि.
हे प्रभुदेवा जीव निर्माण केला. त्या सोबत मानव प्राणी निर्माण केला. मानव प्राण्या मध्यें आम्ही येतो. सृष्टी कर्त्याने सर्व प्राण्यांचा विचार करून सृष्टी निर्माण केली. तुमच्याकडे युग निर्माण करण्याची जबाबदारी होती आणि आहे. आपण सर्व काळ आपल्या मना प्रमाणे निर्माण केलेत. अगदी सत्ययुग पासून आता कलियुग पर्यंत. कलियुगात लोकशाही चीं गोड्स नावानं सत्ता आमच्या वर लादलीस. विचार आणि संकल्पना लोकशाही चीं खुप छान आहे. पण त्या संकल्पनेस काळिमा फसणारे. राज्यकर्ते आमच्यावर बसवलेत." रोज खोटं बोला रेटून बोला " या प्रमाणे कली मध्ये जनतेला लुटणारे लुटारू सत्ता भोगी पुढे आलेत आणि येताय. जनतेचं रक्त पियुन तर्रर्र झालीत पुढारी, राज्यकर्ते. पैसा कुठं ठेवावा हे त्यांना समजतं नाही. इतकी लूट जनतेची हे करताय आम्ही मरतोय अन पुढारी टाळूवरचे लोणी खातोय असं झालंय.हे देवा कलियुगात लुटारू यांना माफ करतोय तु आम्ही काय पाप केलंय चांगलं वागून जगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आता तुला सांगणं आहे ह्या पापी सर्व जे असतील ते पुढारी यांची पाप घडा भर मग कोणी का असेना कोणत्या पण पार्टीचा असेना त्यांना गाड आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेणारा जनतेतून प्रामाणिक. भ्रष्टाचार न करणारा पुढारी निर्माण कर आणि आमची या युगातून लवकर सुटका कर रे देवा.
"तळे राखेल तो फळ चाखेल " असं म्हणतात लबाड पुढारी."फोडा,तोडा,झोडा, सत्ते साठी साम,दाम, दंड वापर करताय सारी पुढारी. त्यात आम्ही भरडले जातोय.आम्हाला "भीक नको कष्टाचे दाम मिळु दे " गुण्यागोविदात आम्हाला जनतेला राहुदेत. आमच्यातून आमचा विचार करणारे. नितीवन्त लोकं सत्तेत बसूदे रे युगपुरुषा. लवकरात लवकर कली संम्पव आणि सत्ययुग सुरु करावं अशीच मागणी आहे आमची.इतकंच मागणं आहे प्रभुदेवा लवकर पूर्ण कराव्यात मागण्या. जनता कंटाळलीय या सर्वच दृष्ट पुढऱ्यांना. यांचा बंदोबस्त कर हिच अपेक्षा ठेवून पत्र संम्पवत आहे. लिहायला खुप आहे पण या पत्रा सोबत चार पाच पान जोडावी लागतील म्हणून थोडक्यात संपवतो अन थांबतो.©️®️
आपलीच जनता अन जनतेच्या विचारातून
प्रतिनिधी
प्रदीप पाटील
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव. पिन. 425108
मो. 9922239055©️®️
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे देवपूरमधील प्रमोद नगरमध्ये प्लॉट नं.८ येथे राहणाऱ्या एका कृषि खत विक्रेत्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आज सकाळी बंद घरात आढ...
-
शिरपूर प्रतिनिधी:- श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट शिरपूर या संस्थेला महाराष्ट्र शासन क्रिडा विभाग धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून सात लाख रुप...
-
साक्री तालुक्याची राजधानी सबोधल्या जाणाऱ्या धाडणे गावात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान तर्फे सलग चौथ्या वर्षी सामाजिक एकोपा, बंधुभाव, आपुल...
-
अमळनेर प्रतिनिधी:- मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत एकाच्या घरात घुसून महिलेला मारहाण व तरुणाला देखील मारहाण करून त्याच्या मो...
-
भारताच्या स्वातंत्र्यानंतर साक्री तालुक्याची रचना झाली त्यावेळी पासून तर आजपर्यंत माजी आमदार स्वर्गीय गोजरताई भामरे या महिला आमदार सोडल्या...
-
अमळनेर प्रतिनिधी:- छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील पाचपेडी, मल्हार येथून प्रियकरासह पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीला अमळनेर रेल्वे संर...
-
मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साकारणार नगरपरिषदेची दररोज पाणी देणारी योजना अमळनेर प्रतिनिधी - शहरवासीयांना संपूर्ण सात दिवस 24 तास म्...
-
आधुनिक शेतीत बदल घडतोय आणि बदल घडवूया शोध नाविन्याचा विश्वास क्वालिटीचा वचन तत्पर सेवेचे महत्व पटत्तय आणि गरज ही बोलून दाखवली जात आहे.जे पिक...
-
धुळे प्रतिनिधी - राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन सुरू असताना धुळे जिल्ह्यातून मात्र अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना समोर आली आहे. धुळे शहरापासू...
-
मुंबई, दि. ९: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा