Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

भविष्यात आपली शेती टिकवायचे असेल व आपल्या पिकाचे उत्पादन वाढवायचे असेल तर पी एम बायोटेकच्या दर्जेदार ऑरगॅनिक खताचा वापरा करावा



आधुनिक शेतीत बदल घडतोय आणि बदल घडवूया शोध नाविन्याचा विश्वास क्वालिटीचा वचन तत्पर सेवेचे महत्व पटत्तय आणि गरज ही बोलून दाखवली जात आहे.जे पिकवतोय तेच विश्वासाने खाताही आले पाहिजे.आमच्या काळात जे पिकायचे तेच घरी खायचो पण आज परिस्थिती तशी नाही,घासच घ्यावासा वाटत नाही असे आपल्या वडील किवा आजोबा यांचे बोल ऐकले कि महत्व लक्षात येतं सेंद्रिय शेतीचं.त्यामुळे जनरेशन गॅप च्या विचारधारेला छेद देत प्राचीन आयुर्वेद आणि अत्याधुनिक जैव तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याची हीच ती वेळ
हजारो वर्षांपासून रुजलेल्या प्राचीन भारतीय आयुर्वेदाचा वारसा व अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सुयोग्य मेळ साधत शहरी प्रदुषणापासून दूर नैसर्गिक स्वच्छ पोल्युशन फ्री लोकेशन मध्ये शेतीमधलं खरं दुखणं लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या दवाखान्यामध्ये त्यावर अभ्यास करून अथक परिश्रमानंतर,कृषी वि‌द्यापीठ तसेच अनुभवी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली,काळाची गरज लक्षात घेऊन,शेतकऱ्याना मदत होण्यासाठी,गैरवाजवी खर्च नियंत्रित करून,उत्पादन खर्च कमी आणि जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी,अत्यंत नाविन्यपूर्ण,अत्याधुनिक आणि भारतात प्रथमच नॅनो तंत्रज्ञानावर आधारित रेसिड्यू फ्री फार्मिंग आणि १००% ऑरगॅनिक फार्मिंग साठी परिपूर्ण दर्जेदार उप्तादनांची सर्वात मोठी श्रेणी घेऊन शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल झाली आहे.
सेंद्रिय शेतीसाठी आता रेसिडीयू फ्री फार्मिंग साठी अत्यंत उपयुक्त अश्या उत्पादनांची श्रेणी पी एम बायोटेक द्वारे उपलब्ध केलेली आहे.
सेंद्रिय तणनाशक,सेंद्रिय बायो गोल्ड सुपर लिक्विड फेरर्मटेड ऑरगॅनिक खत जे कि सेंद्रिय एन पी के,कार्बन यांनी समृद्ध आहे.तसेच नॅनो तंत्रज्ञानावर आधारित फुलांची सेटिंग होऊन फुलगळ थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळबागा,फळभाज्या व पिकांसाठी उपयोगी ऍग्रो मॅजिक फ्लॉवर बुस्टर इ उत्पादने हि अत्यंत उपयुक्त आहेत.
दाणेदार स्वरूपामध्ये जैविक खते उपलब्ध करून देणारी पी एम बायोटेक हि सर्वश्रुत कंपनी आहे.बायो एन पी के,बायो पोटॅश,बायो फॉस ते अगदी बायो कॅल्शियम,आयर्न,सल्फर, बोरॉन,सिलिका इ दाणेदार आणि लिक्विड दोन्ही स्वरूपांमध्ये उपलब्ध आहेत.त्याच बरोबर प्रोम बायो डी.ए.पी बायो यूरिया, बायो पोटॅश,बायो संजीवनी ०५:१०:०५, बायो सम्राट सेंद्रिय खत, निंबोळीयुक्त सेंद्रिय खत इ सेंद्रिय खते उपलब्ध आहेत सर्व प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्ये सैद्रय,जैविक आणि रासायनिक तीन हि स्वरूपामध्ये तयार केली जातात वेगवेगळ्या पिकांसाठी लागणारे किट आणि वापरांचे पिकांवर शेड्युल तसेच शेतकऱ्यांसाठी सल्ला आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे.नर्सरी,टेरेस गार्डेनिन्ग आणि अर्बन फार्मिंग साठी लागणारी सर्व उत्पादने उपलब्ध आहेत
सध्या रासायनिक खतांच्या भरपूर वापरामुळे जमिनीच्या उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम होत असून जमिनी सुपीकता कमी होत आहे.त्यामुळे सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करून जमिनीची सुपीकता आपण अबाधित ठेवू शकतो यासाठी आम्ही जैविक खतांची निर्मिती केली आहे.सध्या मातीतील सेंद्रिय कर्ब खूप कमी झाला आहे.त्यामुळे मातीतील असे उपयुक्त सूक्ष्मजीव खूप कमी झाले आहेत.त्यामुळे मातीची सुपीकता घातली आहे व झाडांची प्रतिकार क्षमता कमी झाली आहे.पूर्वी शेतात खते टाकल्यानंतर रीझल्ट भेटत नव्हते.पण पी एम बायोटेक च्या खतांचा वापर केल्यापासून कृषी निविष्ठांच्या संतुलित प्रमाणाबद्दल भरपूर माहिती मिळाली.त्यामुळे शेती करताना मला नक्कीच त्याचा फायदा होईल अश्या शेतकरी ग्राहक वर्गाच्या बोलक्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
मायकोरायझा ही उपयुक्त बुरशी असून ती झाडांच्या मुळांच्याभोवती वाढते.ती झाडांच्या मुळांतून तिच्या वाढीसाठी लागणारे अन्न घेते व त्याबदल्यात झाडांना लांबून अन्नद्रव्ये व पाणी वाहून आणते.मायकोरायझा स्फुरद झाडांना उपलब्ध करुन देते.
ती झाडांच्या मुळांच्याभोवती स्वतःचे विशाल जाळे तयार करते.या जाळ्यात तिचे अतिशय सूक्ष्म धागे असतात.जिथे झाडाचे मूळ पोहचू शकत नाही तिथे हे सूक्ष्म धागे पोहचतात व अन्नद्रव्ये वाहून आणतात.मायकोरायझाच्या जाळ्यामार्फत झाडे एकमेकांशी संवाद करतात व एकमेकांना रोगकिडींची सूचना देतात.पी एम सिलिस्टिक हे सिलिकॉन बेस व संपूर्ण सेंद्रिय उत्पादन आहे. हे एक अत्यंत प्रभावशाली व एकमेव नॉन आयोनिक सिलिकॉन बेस स्पेहर, पैनीट्रेटर,अॅक्टीवेटर व टी.डी.एस.रिड्यूसर उत्पादन आहे फवारणीच्या वेळी बुरशीनाशक, कीटकनाशक,जीवाणूनाशक, तणनाशक व पिकशक्तीवर्धक टॉनिक सोबत वापरल्याने औषधाची क्रियाशीलता वाढत असल्याचे संशोधनातील निष्कर्षणातून सिद्ध झाले आहे. पी एम सिलिस्टिक मुळे फळे, भाजीपाला,धान्यपिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी चांगले परिणाम मिळतात.
शेतामधील काडीकचरा,शेण इ कुजवून त्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पी एम बायोटेक रॅपिड कपोस्ट हा अत्यंत उपयुक्त आहे
इथून पुढे भीती न बाळगता आपण रेसिड्यू फ्री उत्पादन मिळविण्यासाठी जैविक आणि रासायनिक ची सांगड घालून कमी खर्चात चांगले उत्पन्न घ्यायला हवे.
बायो गोल्ड सुपर है बायोगॅसच्या स्लरीमधुन ४० मि.लि मायक्रॉन फिल्टर‌द्वारे वेगळे केलेले,सुक्ष्म जिवाणूंनी समृद्ध असे प्रवाही मिश्रण आहे.हे मिश्रण,ऑरगॅनिक एन पी के आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ऑरगॅनीक कार्बन,ह्युमिक अॅसीड आणि अमायनो अॅसीड ह्यांचे भरपुर प्रमाण असलेले उत्तम स्त्रोत आहे.प्रवाही स्वरुपात असल्याने पिकांच्या वाढीच्या कोणत्याही टप्यात वापरता येऊ शकते.
पी एम बायोटेक गेली अनेक वर्षांपासून उत्तम गुणवत्तापूर्ण असे सेंद्रिय व विषमुक्त शेतीची उत्पादने तयार करते.पी एम बायोटेक हि भविष्यकाळातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सेंद्रिय शेतीचे महत्त्व व फायदे या सर्व बाबींवर विचार करते.सेंद्रिय उत्पादनांवर अधिकाधिक संशोधन करून शेतकऱ्यांना याचा फायदा करून देणे हेच आमचे ध्येय आहे.पी एम बायोटेक ही 150 ९००१:२०१५ CERTIFIED आहे.या कंपनीचे चे उ‌द्दिष्ट हे भारतातील शेती ही केमिकल विरहित करणे हे होय.
शेतकऱ्यांसाठी आज माती,पाणी परिक्षण प्रयोगशाळा ही अत्यंत आवश्यक बाब झाली आहे. आमच्या असंख्य शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरेल अशी अ‌द्ययावत अशी अॅग्रो अॅनेलिसीस लॅब आपल्या सेवेत रुजू करताना अत्यंत आनंद होत आहे.यापुढे शेतकरी बांधवांना एका अत्यंत खात्रिलायक निदानासाठी पी एम बायोटेक अॅग्री लॅबचा उपयोग होणार आहे.अत्यंत माफक दर व अत्यंत कुशल तंत्रज्ञान व तंत्रज्ञांच्या सहाय्याने आम्ही ही सेवा सुरू करीत आहोत.
सेंद्रीय आणि जैविक खतांचे लक्षवेधी फायदेः पर्यावरणासाठी अनुकुल व किफायतशीर आहेत. त्यांच्या वापरामुळे माती सशक्त,समृध होती आणि मातीची गुणवत्ता सुधारते.जरी ते त्वरीत परीणाम दर्शवत नसले तरी कालांतराने दर्शवलेले परीणाम हे उल्लेखनीय असतात.जमिनीतील नत्र व स्फुरदचे प्रमाण वाढते.मातीतुन होणाऱ्या रोगांचा प्रसार रोखण्यास मदत होते.शेती अधिक शाश्वत व कार्यक्षम बनवण्यासाठी उपयुक्त.
भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे त्यामुळे भारतीय शेतकऱ्यासाठी सेंद्रीय व जैविक खते ही अत्यावश्यक गरज बनली आहे. जैविक व सेंद्रीय खताचा वापर केलास शेतकयांच्या जीवनात आर्थिक सुवत्ता येण्यासाठी सेंद्रीय शेतीच एकमेव पर्याय आहे.रासायनीक शेतीमुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत हे दुष्परिणाम टाळण्यासाठी सध्या सेंद्रिय शेती हा पर्याय पुढे येते असून असल्यानं शेतकऱ्यांनी सदृढ शेतीसाठी दर्जेदार सेंद्रीय खतांचा वापर करावा,असे आवाहन पी.एम बायोटेकच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

तरुण गर्जना न्युज चैनल धुळे जिल्हा प्रतिनिधी
चंद्रशेखर अहिरराव मो 9834568855.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध