Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ एप्रिल, २०२४
शिरपूर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध
मुंबई प्रतिनिधी : ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे रिझर्व्ह बँकेने सोमवारी महाराष्ट्रस्थित शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत.यामुळे या सहकारी बँकेला आता नव्याने कर्ज देता येणार नाही.हे निर्बंध ८ एप्रिलपासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू झाले आहेत.रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेची सध्याची तरलतेची स्थिती लक्षात घेता सर्व बचत, चालू खाती किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.बँकेला रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय नव्याने कर्ज देता येणार नाही.याचबरोबर नवीन गुंतवणूक, ठेवी स्वीकारणे यावरही बंधन असणार आहे.या बँकांना त्यांच्या कोणत्याही मालमत्ता विकता येणार नाहीत,परंतु अटींची पूर्तता करून ठेवींवर कर्ज काढण्याची परवानगी आहे. बँकेच्या पात्र ठेवीदारांसाठी ठेवींवर ५ लाख रुपयांपर्यंतचे कमाल विमा संरक्षण असणार आहे. रिझर्व्ह बँकेने केलेली ही कारवाई म्हणजे बँकेचा परवाना रद्द केलेला नाही. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून आल्यास सहा महिन्यांच्या आधीही हे निर्बंध रिझर्व्ह बँकेकडून शिथिल केले जाऊ शकतात.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील शेवडीपाडा येथे जल जिवन मिशन योजनेत मौजे शेवडीपाडा येथे नळ पाणी पुरवठा जलजीवन योजनेतील संबंधित यंत्रणेचे अधिकारी संगनमताने...
-
राज्यात सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्...
-
1) कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू (महसूल विभाग) 2) ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्स...
-
मुंबई, दि. २७: - राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील सदैव...
-
दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी 1972 मध्ये मुकटी धुळे गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.काँग्रेस पक्षात युव...
-
अमळनेर प्रतिनिधी - अमळनेर येथील शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मंत्री अनिल पाटील यांना झालेल्या बैठकीत पाठींबा जाहीर केला आहे. समस...
-
पुणे, दि.२९: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रो टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेच...
-
धुळे (प्रतिनिधी) येथील स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासन विभागाने गोपनिय माहितीच्या आधारे बुधवारी संयुक्तरित्या शहरातील मिरची मसाल्या...
-
नाशिक, दि. २८ : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत.त्यांनी शेतकरी,कामगार,महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्...
-
कोल्हापूर, दि.२८ : आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत.त्यांचे अनुभव,ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे.त...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा