Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ मार्च, २०२४
Home
/
Unlabelled
/
शिक्षकानेच केले मुलींचे नको ते फोटो व्हायरल, दहिवेल महाविद्यालयातील संतापजनक प्रकार
शिक्षकानेच केले मुलींचे नको ते फोटो व्हायरल, दहिवेल महाविद्यालयातील संतापजनक प्रकार
धुळे प्रतिनिधी :- साक्री तालुक्याच्या दहिवेल येथील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील एका शिक्षकाने महाविद्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर मुलींचे नको ते फोटो व्हायरल करून आदिवासी मुलींची बदनामी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
या प्रकाराला महिना उलटला तरी कोणतीही कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या नेतृत्वाखाली आदिवासी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी धुळे येथे सायबर क्राईम पोलिसांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, दहिवेल येथील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात साक्री तालुक्यातील आदिवासी मुले-मुली शिक्षण घेत आहेत.त्यांची निवास व भोजन व्यवस्था शासकीय आदिवासी वस्तीगृहात करण्यात आली आहे.
''काय आहे नेमके प्रकरण''
9 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमाराला ‘इयत्ता अकरावी सायन्स ग्रुप’‘ साक्री तालुका आमदार ग्रुप’,‘बल्हाने ग्रुप’ या वेगवेगळ्या ग्रुपवर मुलींचे अश्लील फोटो व्हायरल झाले.धक्कादायक म्हणजे फोटो व्हायरल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून, चक्क उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचा शिक्षक अविनाश भटू पाटील होता.त्याने त्याच्या व्हाट्सॲप क्रमांकावरून अत्यंत बीभत्स,घाणेरडे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल करून आदिवासी मुलींची प्रतिमा कलंकित केली.केवळ आदिवासी समाजातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला काळीमा फासण्याचे कृत्य केले आहे.या महाशयांचे हे कृत्य नेहमीचे आहे.
यापूर्वीही असे प्रकार त्यांनी केले आहेत.विकृत मनोवृत्तीचे हे शिक्षक समाजासाठी कलंक आहेत.
वसतिगृहाच्या महिला वाॅर्डनची बघ्याची भूमिका दहिवेल येथील शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृहाच्या गृहपाल श्रीमती रीना जाधव यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
वसतिगृहाच्या गृहपाल म्हणून मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची आहे.त्यामुळे हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी लगेच गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते.परंतु त्यांनी याबाबत 10 फेब्रुवारी रोजी केवळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून जबाबदारी झटकली.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.
शिक्षक म्हणतो माझा मोबाईल हॅक झाला होता हा प्रकार घडल्यानंतर संबंधित शिक्षक अविनाश भटू पाटील याने त्याचा मोबाईल हॅक झाल्याबाबत सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. त्या तक्रारीचाही अद्याप कोणताही तपास झालेला नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की,आम्ही व्हाॅट्सॲप कंपनीकडून माहिती मागविली आहे. माहिती मिळाल्यानंतर सत्यता समोर येणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि तांत्रिक तपास करुन संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी निवेदनात केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे प्रतिनिधी :- काल धुळे शहरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ची शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली, यात्रेत जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे आणि ...
-
राज्यात सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्...
-
1) कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू (महसूल विभाग) 2) ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्स...
-
अमळनेर प्रतिनिधी : महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी नणंद व तिच्या प्रियकराला न्यायालयाने २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अवघ्या तीन तासात पोलिस...
-
मुंबई, दि. २७: - राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील सदैव...
-
दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी 1972 मध्ये मुकटी धुळे गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.काँग्रेस पक्षात युव...
-
पुणे, दि.२९: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रो टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेच...
-
धुळे (प्रतिनिधी) येथील स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासन विभागाने गोपनिय माहितीच्या आधारे बुधवारी संयुक्तरित्या शहरातील मिरची मसाल्या...
-
नाशिक, दि. २८ : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत.त्यांनी शेतकरी,कामगार,महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्...
-
मुंबई, दि. २४: राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा