Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
एसटी महामंडळाची महाराष्ट्रातील अयोध्येला जाणारी पहिली बससेवा १० फेब्रुवारीपासून सुरू....!
एसटी महामंडळाची महाराष्ट्रातील अयोध्येला जाणारी पहिली बससेवा १० फेब्रुवारीपासून सुरू....!
धुळे प्रतिनिधी:- अयोध्येतील राम मंदिरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याच्या दुसऱ्यादिवशीपासून रामललाच्या दर्शनासाठी राम मंदिरात मोठी गर्दी होत आहे. तर, अयोध्या नगरीतही रामभक्तांचा मेळा जमल्याचं पाहायला मिळालं. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने रामभक्तांना दर्शनासाठी फेब्रुवारी महिन्यात येण्याचं आवाहनही केले होते. त्यानुसार, आता देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येला भाविक जात आहेत. विशेष म्हणजे या भाविकांसाठी विशेष रेल्वे आणि बससेवाही सुरू होत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही महाराष्ट्रातून थेट अयोध्येला जाणारी बससेवा सुरू केली आहे.
एसटी महामंडळाची महाराष्ट्रातील अयोध्येला जाणारी पहिली बससेवा आज १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. धुळे जिल्ह्यातून ही बस थेट अयोध्येसाठी रवाना होत आहे. आज पहाटे धुळे बस स्थानकातून पहिली बस अयोध्यकडे रवाना झाली. या पहिल्या बससेवेतच प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी, धुळे परिवहन विभागाचे अधिकारी पोलीस आणि प्रवाशांनी पहिल्या बसचा आनंद साजरा केला. अयोध्येला जाण्यासाठी रेल्वेकडून विशेष धार्मिक पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या दर्शन यात्राही सुरू करण्यात आली आहे. तर, खासगी बससेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडूनही अयोध्येला लक्झरी बसने जाता येते. मात्र, आजही प्रवाशांना राज्य शासनाच्या एसटी महामंडळावरील प्रवासावर मोठा विश्वास आहे. सुरक्षित आणि उत्तम प्रवास म्हणून लालपरी ओळखली जाते. म्हणूनच, कुठल्या नवीन प्रवासासाठी लालपरी आहे का, याची माहिती प्रवाशांकडून घेतली जाते. आता, विदर्भ आणि खान्देशातील प्रवाशांना धुळ्यातून थेट अयोध्येला बसने जाता येईल. धुळ्याहून निघालेली ही बस तब्बल २० तासांचा प्रवास करुन १६०० किमी अंतर कापणार आहे. या बसने अयोध्या प्रवासासाठी ४ हजार रुपये इतके भाडे प्रवाशांकडून आकारण्यात येत आहे. प्रवाशांना बसमध्ये विशेष सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत. या सोबतच दोन चालक आणि परिवहन महामंडळाचे दोन अधिकारी देखील या बस मध्ये असणार आहेत. चार ते पाच दिवसांचा हा अयोध्या दर्शनचा प्रवास असणार आहे.
धुळे ते अयोध्या, वाराणसी
धुळ्याहून ही १० फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता निघाली असून १२ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता अयोध्येत पोहचेल. त्यानंतर, १२ तारखेला अयोध्यातून वाराणसीला जाईल. वाराणसीतील प्रयागराज मुक्कामी बस असणार आहे. दुसऱ्यादिवशी सकाळी प्रयागराजहून धुळ्याकडे बस प्रस्थान करेल. अशी माहिती धुळे परिवहन विभागातर्फे देण्यात आली आहे. धुळ्याहून अयोध्येला जाण्यासाठी ४,५४५ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे देवपूरमधील प्रमोद नगरमध्ये प्लॉट नं.८ येथे राहणाऱ्या एका कृषि खत विक्रेत्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आज सकाळी बंद घरात आढ...
-
शिरपूर प्रतिनिधी:- श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट शिरपूर या संस्थेला महाराष्ट्र शासन क्रिडा विभाग धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून सात लाख रुप...
-
पिंपळनेर,दि.21साक्री तालुक्यातील जैताणे येथे प्रेयसीसोबत गप्पा मारणार्या आदिवासी भिल समाजाच्या तरूणास बेदम मारहाण करण्यात आली.उपचारादरम्यान...
-
गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खत शेतकऱ्यांना विक्री हेतू उपलब्ध होत असल्याबाबत तक्रा...
-
वर्णेश्वर मंदिर संस्थेसह ग्रामिण भागातील मंदिरांचा समावेश-मंत्री अनिल पाटील अमळनेर प्रतिनिधी:- अमळनेर-महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृ...
-
शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील वाघाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच किशोर माळी यांच्यावर गावातील काही समाज कंटकांनी भ्याड हल्ला केला, या घटनेचा ती...
-
धुळे प्रतिनिधी :- काल धुळे शहरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ची शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली, यात्रेत जयंत पाटील, खा.अमोल कोल्हे आणि ...
-
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील एका २८ वर्षीय महिलेचा खून झाल्याची प्राथमिक माहिती सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली...
-
भारताच्या स्वातंत्र्यानंतर साक्री तालुक्याची रचना झाली त्यावेळी पासून तर आजपर्यंत माजी आमदार स्वर्गीय गोजरताई भामरे या महिला आमदार सोडल्या...
-
अमळनेर प्रतिनिधी : महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी नणंद व तिच्या प्रियकराला न्यायालयाने २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अवघ्या तीन तासात पोलिस...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा