Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०२४

वाडी बु येथे मुख्य रस्त्यावर उकिरड्यांचे साम्राज्य....!



शिरपूर (वार्ताहर) - एकीकडे शासन हे स्वच्छ गाव,सुंदर गाव व संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान ही संकल्पना राबवत आहे व दुसरीकडे वाडी बु ग्रामपंचायतीने अस्वच्छतेचा कळस गाठला आहे वाडी - शिरपूर रस्ता पूर्ण दुर्गंधीयुक्त बनला असून रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

वाडी बु गावात दुर्गंधीयुक्त घाणीच्या साम्राज्य निर्माण झाले आहे. वाडी येथून शिरपूर कडे जाणारा मुख्य रस्ता असून येथून ग्रामस्थ व विद्यार्थी, शिरपूर व बोराडी कडे ये - जा करणाऱ्या प्रवाशांसाठी जाण्या- येण्यासाठी हा एकमेव जवळचा मार्ग असल्याने नागरिकांची या रस्त्यावर सततची वर्दळ आसते. हा रस्तावर पूर्णपणे उकिरड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.व मुख्य रस्त्यावर उकिरड्यांतुन वाट काढत वाहन चालवावे लागते.गावलागतच्या मुख्य रस्त्यावर वाडी गावातील कानाकोपऱ्यात चिकन कटाईचा व्यवसाय करणारे बॉयलर कोंबड्यांचे पंख,खराब मांस रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे फेकले जात आहे.
               
तसेच हे सर्व वाडी बु ग्रामपंचायतीच्या शंभर ते दिडशे मीटरच्या अंतरावर असल्याने ग्रामीण प्रशासनातर्फे या भागातील लोकांना रात्री बेरात्री घाण पाण्यातून ये जा करावी लागत आहे तसेच सदर ठिकाणी डासांची उत्पत्ती करिता पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राम पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देवून योग्य ती उपाय योजना करावी तसेच ज्या व्यक्तीचा उकिरडा आहे त्याला नोटींस देण्यात यावी व उकिरडा उचलण्यात यावा अशी मागणी नागरीकांकडून होत आहे..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध