Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ मार्च, २०२२
देशात सध्या द काश्मीर फाईल्स चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा होताना दिसत आहे.या चित्रपटाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत चर्चा करुन हा चित्रपट पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले.जम्मू काश्मीरमधून जे काश्मीरी पंडित स्थलांतरित झाले आणि त्यांची नंतर दयनीय अवस्था झाली त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की,या प्रकारची सत्य बाहेर आली पाहिजे.जे सत्य अनेक वर्षांपासून दडपून ठेवले होते,ते या चित्रपटाच्या माध्यमातून सांगितले गेले आहे.
आणि ज्यांना या चित्रपटातील गोष्ट खरी वाटत नाही त्यांनी दुसरा चित्रपट बनवावा असेही त्यांनी सांगितले.त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत नरेंद्र मोदी यांना सवाल उपस्थित केला की,त्यांचा कळवळा एवढा जाणवत असेल तर गेल्या सात वर्षात विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी मोदी सरकारने काय केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांवर बोलताना अर्थसंकल्पाचाही विषय उचलून धरला.त्यांनी यावेळी मोदी सरकारला जम्मू काश्मीरमधील पंडितांचा कळवळा येत आहे तर मग त्यांच्यासाठी मोदी सरकारने स्वतंत्र काय तरतूद केली आहे.त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणते नवीन कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यांची परिस्थिती सांगत असताना गेल्या साठ वर्षाचा निर्वाळा तुम्ही किती दिवस देणार आहात आणि आता तुम्ही गेल्या सात वर्षात त्यांच्यासाठी काय केले आहे.
असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सध्या सत्तेत असलेल्या केंद्र सरकारने काश्मिरी नागरिकांसाठी हजारो नोकऱ्या देण्याचे अश्वासन दिल्याचा आरोप करत त्यांच्यासाठी आतापर्यंत काहीच केले नसल्याचे सांगितले.त्यामुळे मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्यासाठी प्रत्यक्षात काय झाले हे जाणून घेण्याची खरी गरज आहे असे मतही सुप्रिया सुळे यांनी मांडले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा येथे सप्टेबर २०२४ शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन १६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर ३-४ नराधमांनी केलेल...
-
अमळनेर: तालुक्यातील चौबारी येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना १९ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माह...
-
अमळनेर : तालुक्यातील बोहरा रस्त्यावर १६ रोजी महसूल पथकाने अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून मुद्देमालासह तहसील कार्य...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
रस्ता मंजूर नाही;पाटी का लावली? ग्रामस्थांचा सवाल नंदूरबार प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगलापाणी ५ किलोमीट...
-
शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री खंडेराव महाराजांचा यात्रौत्सव उद्या दि.१२ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. महाआरतीच...
-
संपादकीय भारताच्या संविधानाने आम्हाला मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. संविधान कायद्यापुढे समानता ही आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीस भारताच्या...
-
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.28 महाराष्ट्र बोर्डाने मार्च2020 दहावीच्या निकालाची तारीख आता जाहीर केली आहे. उद्या म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा