Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
वृत्तपत्रात बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवरील हल्ले ही चिंतेची बाब कुठली बातमी छापायची किंवा नाही याचा अधिकार पत्रकारांना देणार की नाही ? पत्रकार हल्ला विरोधी कृति समितीचे मुख्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांचा संतप्त सवाल
वृत्तपत्रात बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवरील हल्ले ही चिंतेची बाब कुठली बातमी छापायची किंवा नाही याचा अधिकार पत्रकारांना देणार की नाही ? पत्रकार हल्ला विरोधी कृति समितीचे मुख्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांचा संतप्त सवाल
एस.एम.देशमुख यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की,कुठली बातमी छापायची किंवा नाही,एवढा तरी अधिकार पत्रकारांना देणार आहात की नाही ? एखाद्याच्या विरोधात बातमी आली तर पत्रकारांवर हल्ले होणे हे नित्याचेच झाले असले तरी आता बातमी छापली नाही म्हणून देखील पत्रकारांवर हल्ले होत आहेत.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाज येथे काल अशीच घटना घडली. बाज येथील ‘तरुण भारत’चे पत्रकार नाना बाबू गडदे यांनी बातमी छापली नाही म्हणून त्यांना लाठ्या, काठ्या उसाने बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून माजी सरपंचासह सर्व आरोपी फरार आहेत.बाज येथील माजी सरपंच संजय आनंदा गडदे यांनी ८ मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याची बातमी मला द्या मी पाठवतो असे पत्रकाराने सांगितले होते.मात्र माजी सरपंचाने ती दिली नाही. परिणामतः बातमी छापली गेली नाही.त्या रागातून पत्रकार गडदे यांच्यावर हल्ला करण्यात आला.घटनेची माहिती मिळताच जत येथील सर्व पत्रकार एकत्र आले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठले. आरोपीच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच कडेगाव तालुक्यात सुरज जगताप यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.त्या प्रकरणात जिल्ह्यातील पत्रकारांनी एकजुटीचे दर्शन घडवत आरोपींना गजाआड करण्यात यश मिळविले होते. एका महिन्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या दोन घटना घडल्याने राज्यासह सांगली जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे.
जत तालुका पत्रकार संघ,सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्ल्याचा निषेध केला असून पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीबददल परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना धन्यवाद दिले आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाटा येथे सप्टेबर २०२४ शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन १६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तीच्यावर ३-४ नराधमांनी केलेल...
-
अमळनेर: तालुक्यातील चौबारी येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना १९ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माह...
-
अमळनेर : तालुक्यातील बोहरा रस्त्यावर १६ रोजी महसूल पथकाने अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून मुद्देमालासह तहसील कार्य...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
रस्ता मंजूर नाही;पाटी का लावली? ग्रामस्थांचा सवाल नंदूरबार प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगलापाणी ५ किलोमीट...
-
शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री खंडेराव महाराजांचा यात्रौत्सव उद्या दि.१२ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. महाआरतीच...
-
गलंगी नाक्यावर वाहनांची तपासणी थाळनेर : सध्या देशासह राज्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूने थैमान घातल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या द...
-
संपादकीय भारताच्या संविधानाने आम्हाला मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत. संविधान कायद्यापुढे समानता ही आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीस भारताच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा