Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२
महाड पूर निवारण कार्यवाहीचा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 15: रायगड जिल्ह्यातील महाड येथे सावित्री नदीला जुलै महिन्यात आलेल्या पूरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. भविष्यात अशा परिस्थितीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच पूर निवारणासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करण्यासाठी पूरनिवारण समिती, आयआयटी (मुंबई) जलसंपदा विभाग, कोंकण रेल्वे, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम या सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक दि. 4 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती.
त्या अनुषंगाने केलेल्या कार्याचा प्रगती अहवाल व पूर निवारणासाठीच्या कार्यवाहीची गतिमानता वाढविण्यासाठी आज राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
महाड पूर निवारण समितीच्या उपस्थित झालेल्या या बैठकीत खासदार सुनील तटकरे,आमदार भरतशेठ गोगावले,महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप,मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता,रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,डॉ. अमितकुमार सैनी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड हे या बैठकीसाठी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की,प्रत्यक्ष कार्यस्थळी प्रगती होण्यासाठी या बैठकीच्या माध्यमातून विहीत कालावधीमध्ये म्हणजे पावसाळ्यापूर्वी सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे.या उपाययोजना करण्यासाठी महाड प्रांतअधिकारी यांनी जलसिंचन विभाग,पूरनिवारण समिती, आयआयटी (मुंबई) व कोंकण रेल्वे यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका साधावी.सावित्री नदीमधील गाळ तसेच नदी पात्रातील बेटे काढण्याची प्रक्रिया अधिक जलद होणे गरजेचे आहे. तटीय नियमन क्षेत्र म्हणजेच सीआरझेडच्या परवानगीबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्यात येईल,असे पालकमंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारित असलेल्या नदी पात्रातील गाळ हातपाटीने काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिल्याबाबत माहिती यावेळी देण्यात आली.जलसिंचन विभागाच्या तांत्रिक विभागाने आवश्यक त्या यंत्रसामुग्रीची उपलब्धता खाजगी पद्धतीने करण्यात येत असल्याबाबत यावेळी सांगितले.मागील बैठकीच्या अनुषंगाने महाड येथील कोकण रेल्वेच्या पुल परिसरातील भरावामुळे पाण्याच्या पातळीबाबत वस्तुस्थिती अहवाल आयआयटी, मुंबई यांच्याकडून मागविण्यात आला आहे.
त्यानुसार जुलै महिन्यात आलेल्या पूराच्या मुख्य कारणामंध्ये या पुलामुळे विशेष प्रभाव नसल्याबाबत सांगितले.
यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की,सर्व शासकीय यंत्रणा ह्या सावित्री नदी व महाड येथे भविष्यात आपतकालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी बहुआयामी प्रयत्न करीत आहेत.सर्व स्तरावरील परवानग्या, प्रत्यक्ष कार्यासाठी करण्यात येणाऱ्या निविदा प्रकीया याबाबत अधिक गतिमानतेन कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना संबंधित सर्व शासकीय विभागांना दिल्या.
आपतकालीन व्यवस्थापनासाठी महाड येथे कारावयाच्या कार्यवाहीसाठीची कार्यमर्यादा लक्षात घेता, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी नियुक्त केलेल्या संस्थेस जलसंपदा विभागाने कालबद्ध वेळेत कार्य करण्यासाठी विहीत पद्धतीने नियुक्त केल्यास याकामी वेळीची बचत होईल.शासकीय यंत्रणा याबाबत सर्वपातळीवर कार्यरत आहेत,असे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता म्हणाले.महाड येथे सावित्री नदीपात्रात करावयाच्या प्रत्यक्ष कार्यास गतिमानता मिळाली असून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करुन प्रशासकीय यंत्रणा कार्य करेल असा विश्वास व्यक्त करुन महाड पूर निवारण समिती,प्रशासकीय यंत्रणांचे उपस्थित स्थानिकांनी यावेळी आभार मानले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
Newer Article
पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे खा.संजय राऊतांना राज्यसभेतून निलंबित करा ; नाशिकमधून थेट उपराष्ट्रपतींना पत्र
Older Article
रायगड विकास प्राधिकरणामार्फत किल्ले रायगडावर निकृष्ठ दर्जाची कामे कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या गोमांस विक्री करणाऱ्या तिघांना साहित्यासह केली अटक पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस स्टेशनच्या बाहेर तर...
-
शिरपुर प्रतिनिधी- शिरपूर तालुका म्हटले म्हणजे सर्वप्रथम सर्वसामान्याच्या डोळ्यासमोर येते ते, शिरपुर नगरचे भाग्यविधाते व विकासपुरुष मा, आमदार...
-
मोफत वीज, वाढीव अनुदान आणि वेगवान गृहनिर्माण... प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी! केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शा...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
-
रणाईचे येथे भक्तनिवास सह विविध विकास कामांचे भूमिपूजन अमळनेर-तालुक्यातील रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरातील महंत बाबांचा मला न...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासह मध्यप्रदेश व इतर राज्यात बॅग लिफ्टिंग सह ,बँकेतून काढलेले पैसे लंपास...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर:- तालुक्यातील मुंगसे येथील २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ रोजी सायंकाळी...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे खोटी माहिती व कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत चारशे बोगस मतदाराची नावे समाविष्ट करण्या...
-
तरूण गर्जन रिपोट अमळनेर प्रतिनिधी :- तालुक्यातील मुंगसे येथील २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ रोज...
-
जळगाव प्रतिनिधी :- शहरातील शाहूनगर भागात एमडी ड्रग्जचा साठा करून विक्री करणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ लाख ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा